Friday 31 July 2015

‘झोंपाळ्यावरची गीता`चे आज रत्नागिरीत पुनर्प्रकाशन

रत्नागिरी - दत्तात्रेय अनंत आपटे ऊर्फ कवी अनंततनय यांनी १९१७ साली लिहिलेल्या झोंपाळ्यावरची गीता` या श्लोकसंग्रहाचे उद्या (ता. १) रत्नागिरीत ९८ वर्षांनी पुनर्प्रकाशन होणार आहे.
लोकमान्य टिळक यांचे सकालीन असलेले कवी अनंततनय (जन्म १८७९, मृत्यू १९२९) यांनी हृदयतरंग, पद्यदल, बालगीता, श्रीशारदादूतिका, पुण्याची पर्वती, कविचरित्र अशी विविध प्रकारची काव्यरचना केली. सनातन धर्माचे स्वरूप, काव्यचर्चा, विनायकाची कविता अशा विविध ग्रंथांचे संपादन आणि संकलनही त्यांनी केले. श्री हाराष्ट्र शारदामंदिर` या कवींसाठी स्थापन झालेल्या संस्थेचे ते आधारस्तंभ होते. काही बंगाली गीतांचीही त्यांनी राठीत भाषांतरे केली. मूळच्या संस्कृतधील गीतगोविंद` या कृष्णकाव्याच्या बंगालीतील अनुवादाचा अनंततनयांनी राधामाधवविलास` नावाने राठीत अनुवाद केला. कवी केशवसुतांना राठीच्या नवकवितेचे जनक म्हटले जाते. शंभर वर्षांनंतरही त्यांचे राठी वाङ्यातील स्थान अढळ आहे; मात्र अनंततनय यांनी नवकवितेला कडाडून विरोध केला होता.
झोंपाळ्यावरची गीता` ही अनंततनय यांचीच रचना आहे. या श्लोकसंग्रहात भगवद्गीतेच्या सर्व अध्यायांचा आशय असलेले श्लोक त्यांनी राठीत लिहिले आहेत. मूळ भगवद्गीतेतील श्लोकांची संख्या ७०० असून `झोपाळ्यावरच्या गीतेध्ये ५४६ श्लोक आहेत. श्लोकांची संख्या कमी असली, तरी मूळ गीतेतील संपूर्ण आशय त्याध्ये अत्यंत सोप्या शब्दांत आला आहे. पूर्वी मुलींचे विवाह वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षीच होत. चैत्रगौरीच्या निमित्ताने त्या माहेरी येत, त्या वेळी झाडांना किंवा अंगणात झोपाळे बांधून त्यावर त्यांचे खेळ चालत. त्या वेळी वेगवेगळी गाणी म्हटली जात. त्याबरोबरच या मुलींनी गीता म्हटली, तर लहान वयात त्यांना चांगले ज्ञान मिळू शकेल, या उद्देशाने त्यांनी झोपाळ्यावरची गीता लिहिल्याचा उल्लेख त्यांच्या प्रस्तावनेत आहे. या संग्रहाच्या तीन आवृत्त्या त्या काळात अकरा वर्षांत प्रसिद्ध झाल्या. शतकाच्या उंबरठ्यावर असलेला राठीतील श्लोकसंग्रहाचा हा दुर्मिळ आणि अनमोल ठेवा पुन्हा एकदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुस्तिकेचे संकलन करण्यात आले आहे. मूळचे रत्नागिरीचे रहिवासी आणि पुण्यातील पत्रकार अनिकेत कोनकर (कॉपी एडिटर, हाराष्ट्र टाइम्स, पुणे) यांनी हे संकलन केले असून रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशनने ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. सोबत अनंततनय यांचा परिचय, मूळ पुस्तिकेतील प्रस्तावना  आणि तुलनात्मक अभ्यासाकरिता भगवद्गीतेचे अध्यायही देण्यात आले आहेत.

लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्यच्या प्रकाशनाच्या शताब्दीनिमित्त रत्नागिरीत उद्यापासून (ता. १ ऑगस्ट) दोन दिवसांचे विशेष चर्चासत्र यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि गीता मंडळातर्फे होणार आहे. तेच औचित्य साधून श्रीत् टिळक-विजयहे लोकमान्य टिळकांचे ओवीबद्ध चरित्र लिहिणाऱ्या कवी अनंततनय यांच्याच झोपाळ्यावरच्या गीतेचे पुनर्प्रकाशन केले जाणार आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते उद्या सकाळी १० वाजता गीता भवन येथे प्रकाशन समारंभ होईल.

No comments:

Post a Comment