Thursday 10 September 2015

मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रुतिका भागवत प्रथम

नवनिर्माण महाविद्यालय स्पर्धा : कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत अश्विनी कांबळे प्रथम


दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करताना
शीला हेगशेट्ये
, सोबत प्राचार्य सुकुमार शिंदे, प्रा. टेकाळे.

रत्नागिरी – येथील नवनिर्माण महाविद्यालयात झालेल्या मृणाल हेगशेट्ये आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रुतिका भागवत (एसीएस कॉलेज, लांजा) हिने, तर कनिष्ठ महाविद्यालयीन जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अश्विनी कांबळे (नवनिर्माण महाविद्यालय, रत्नागिरी) हिने प्रथम क्रमांक पटकावला.

गेल्या ४ सप्टेंबर २०१५ रोजी नवनिर्माण महाविद्यालयात ही स्पर्धा झाली. राज्यस्तरीय महाविद्यालयीन, तर जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन अशा दोन गटांत ही स्पर्धा झाली. दोन्ही स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा सविस्तर निकाल असा - राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा - प्रथम - श्रुतिका भागवत (एसीएस कॉलेज, लांजा), द्वितीय - श्रेयस सनगरे (नवनिर्माण महाविद्यालय, रत्नागिरी), तृतीय - पद्मश्री वालावडे (फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी, रत्नागिरी), उत्तेजनार्थ - विवेक चित्ते (एचपीटी अ‍ॅण्ड आरवायके कॉलेज, नाशिक), श्रुती भिंगार्डे (एसीएस कॉलेज, लांजा). सांघिक चषक - एसीएस कॉलेज, लांजा.
कनिष्ठ महाविद्यालयीन जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा - प्रथम - अश्विनी कांबळे (नवनिर्माण ज्यु. कॉलेज, रत्नागिरी), द्वितीय - कोमल रावराणे (वि. स. गांगण कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी), तृतीय- शलाका वारेकर (नवनिर्माण ज्यु. कॉलेज, रत्नागिरी), उत्तेजनार्थ - तैबा रफिक बोरकर (अभ्यंकर कुलकर्णी ज्यु. कॉलेज, रत्नागिरी), गौरी रहाटे (साडवली, ज्यु. कॉलेज), सांघिक चषक – नवनिर्माण ज्यु. कॉलेज, रत्नागिरी.
विजेत्यांना रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, माजी न्यायमूर्ती भास्कर शेट्ये, जेएसडब्ल्यूचे जनसंपर्क अधिकारी राजीव लिमये, नवनिर्माण हायच्या संचालिका सीमा हेगशेट्ये, प्राचार्य सुकुमार शिंदे, शीला हेगशेट्ये, मेधा हेगशेट्ये यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेत ९० स्पर्धकांनी सहभाग घेतला. रत्नागिरीसह सातारा, नाशिक, ठाणे, रायगड, मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील स्पर्धकांचा त्यात समावेश होता.
यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांनी विविधांगी वाचन करून आपल्या ज्ञानात वाढ केली पाहिजे. वक्तृत्व कलाही महत्त्वाची आहे. वाचन करून त्यावर चिंतनातून आपली मते तयार केली, तर वक्तृत्वाला झळाळी प्राप्त होते.
माजी न्यायमूर्ती भास्कर शेट्ये म्हणाले, समाजातील चुकीच्या गोष्टींवर वक्त्यांनी बोलून समाजाचे प्रबोधन करावे. अभ्यासाला महत्त्व देऊन विधायक गोष्टींच्या निर्मितीसाठी विद्यार्थीदशेतूनच सक्रिय व्हावे.
स्पर्धेसाठी प्रमोद कोनकर, प्रा. नामदेव कुंभार, सौ. स्नेहा साखळकर, डॉ. आशा जगदाळे, प्रा. राजशेखर दवणे, प्रा. पौर्णिमा सरदेसाई यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रा. प्रकाश नाईक यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सचिन टेकाळे यांनी आभार मानले.
.............
मृणाल हेगशेट्ये वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांसमवेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, माजी न्यायमूर्ती भास्कर शेट्ये, जेएसडब्ल्यूचे जनसंपर्क अधिकारी राजीव लिमये, प्राचार्या सुकुमार शिंदे, संचालिका सीमा हेगशेट्ये, शीला हेगशेट्ये, मेधा हेगशेट्ये, परीक्षक प्रमोद कोनकर, राजशेखर दवणे,  प्रा. आशा जगदाळे, प्रा. पौर्णिमा सरदेसाई आदी.
................................


1 comment:

  1. अशा विचारप्रवर्तक स्पर्धा सर्वच महाविद्यालयांमध्ये झाल्यास तरुणांच्या विचारशक्तीला चालना मिळेल.

    ReplyDelete