Monday 7 September 2015

`झेलू पाऊस ओंजळीत`चे औरंगाबाद येथे प्रकाशन

कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेसतर्फे पुस्तकाची निर्मिती


  मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानचे विश्वस्त उल्हास परांजपे यांनी लिहिलेल्या `झेलू पाऊस ओंजळीत` या पुस्तकाचे नुकतेच औरंगाबाद येथे प्रकाशन झाले.  पावसाचे पाणी साठविण्याच्या विविध उपायांची माहिती देणाऱ्या या पुस्तकाचे प्रकाशन आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या 81 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोन दिवसांची जलविषयक परिषद औरंगाबाद येथे झाली. त्यावेळी डॉ. चितळे यांचे अभीष्टचिंतनही करण्यात आले. या समारंभातच `झेलू पाऊस ओंजळीत` या पुस्तकाचे प्रकाशन जलतज्ज्ञ दि. मा. मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
       `झेलू पाऊस ओंजळीत` या पुस्तकाची अक्षरजुळणी,  संकलन आणि संपादन रत्नागिरीच्या कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस या संस्थेने केले आहे. पुण्यातील बुकगंगा इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय पुस्तक वितरण संस्थेच्या कार्यालयात तसेच संस्थेच्या संकेतस्थळावरून हे पुस्तक उपलब्ध होऊ शकेल. रत्नागिरीत कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस (9822255621) तसेच मॅजेस्टिक बुक हाऊस (पुढारी भवन, माळ नाका, रत्नागिरी) येथेही पुस्तक उपलब्ध होईल.
औरंगाबाद येथे `झेलू पाऊस ओंजळीत`चे प्रकाशन
----------------------------------------------


प्रकाशन समारंभानंतर जलवर्धिनी संस्थेतर्फे बांधण्यात आलेल्या जलसाठवण
टाकीची पाहणी डॉ. चितळे यांनी केली. त्यांना माहिती देताना उल्हास परांजपे
......................................................................

`झेलू पाऊस ओंजळीत`ची झलक













No comments:

Post a Comment