Saturday 15 July 2017

अखिल भारतीय आयुर्वेद संमेलनाच्या रत्नागिरी शाखाध्यक्षपदी योगेश मुकादम




      रत्नागिरी – अखिल भारतीय आयुर्वेद संमेलनाच्या रत्नागिरी जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी रत्नागिरीतील वैद्य योगेश मुकादम यांची निवड झाली आहे.
      अखिल भारतीय आयुर्वेद संमेलन ही संस्था पदेशास्त्री यांनी १९०७ साली स्थापन केली. या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री. त्रिगुणा हे निती आयोगाचे सदस्य असून राष्ट्रपतींच्या वैद्यकीय सल्लागार मंडळात त्यांचा समावेश आहे. संस्थेचा आता प्रसार करण्यात येणार आहे. त्याकरिता रत्नागिरीच्या शाखेचे पुनरुज्जीवन करण्यात आले असून अध्यक्षपदी वैद्य योगेश मुकादम यांची निवड करण्यात आली आहे. शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ही निवड करण्यात आली. अ. भा. आयुर्वेद संमेलनाचे अध्यक्ष वैद्य दीनानाथजी उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वैद्य मुकादम यांना त्यांच्या निवडीचे पत्र संस्थेच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष वैद्य रामदास आव्हाड (कोपरगाव), राज्य कार्यकारिणीचे स्वानंद पंडित, प्रवीण जोशी (धुळे) आदींच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
      अखिल भारतीय आयुर्वेद संमेलन या संस्थेने गेल्या ११० वर्षांमध्ये आयुर्वेद प्रसाराचे कार्य केले असून आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार करणे, स्वस्त दरातील औषधे आणि उपचार उपलब्ध करून तळागाळातील छोट्या आणि गरीब रुग्णांपर्यंत आयुर्वेद पोहोचविणे, आयुर्वेद पदवीधर असणाऱ्या पण आधुनिक लोपॅथी प्रॅक्टिस करणाऱ्या वैद्यवर्गाला सहकार्य करून त्यांनीही आयुर्वेद प्रॅक्टिस सुरू करण्यास मार्गदर्शन करणे इत्यादी उद्दिष्टे घेऊन संस्था कार्य करणार आहे. संस्थेची रत्नागिरीची शाखा पुनरुज्जीवित करण्यात आली असून जिल्ह्याची कार्यकारिणी लवकरच तालुकास्तरावर विस्तारित करण्यात येणार असल्याचे नूतन अध्यक्ष योगेश मुकादम यांनी सांगितले.
(संपर्क - 9421229045)
........
शिर्डी - अखिल भारतीय आयुर्वेद संमेलन संस्थेच्या रत्नागिरी शाखाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र योगेश मुकादम यांना प्रदान करताना संस्थेच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष वैद्य रामदास आव्हाड (कोपरगाव). सोबत अन्य मान्यवर.

3 comments:

  1. अभिनंदन योगशजी!

    ReplyDelete
  2. अभिनंदन योगशजी!

    ReplyDelete
  3. अभिनंदन डॉक्टर साहेब.

    ReplyDelete