Thursday 24 November 2016

रत्नागिरीतील मैदानांच्या व्यवस्थेकडे विशेष लक्ष देणार- कौस्तुभ सावंत

                रत्नागिरी, २४ नोव्हेंबर, (हिं. स.) : गुणवंत खेळाडूंना पोषक वातावरण तयार करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असून त्यासाठी सर्वप्रथम मैदानाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची घोषणा जनजागृती संघाने पाठिंबा दिलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार कौस्तुभ सावंत यांनी केली आहे.
याविषयी बोलताना श्री. सावंत म्हणाले की, मुलांचे मैदानी खेळ कमी होताहेत अशी ओरड सगळेच करताना दिसतात. विशेषतः राष्ट्रीय, ऑलिम्पिक स्पर्धा सुर झाल्या की आपल्या या काळजीला विशेष धार येते. पण काही प्रश्न आपण स्वतःला तर काही प्रशासनाला विचारायला हवेत. सर्वप्रथम मुलांना खेळायला आपण मैदाने शिल्लक ठेवली आहेत का? आपल्या शहरातही एखादा धोनी, तेंडुलकर तयार व्हावा, असे आपल्याला वाटते जरूर, पण त्यासाठी गरज आहे ती परिपूर्ण मैदानांची, खेळाडूंना योग्य सुविधा, प्रोत्साहन उपलब्ध करून देण्याची, मैदानाच्या सुरक्षिततेची. यातल्या कोणत्या गोष्टीची जबाबदारी कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून आपण आणि जबाबदार स्थानिक स्वराज संस्था म्हणून नगर परिषद उचलते? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, रत्नागिरीत पूर्वी शिवाजी क्रीडांगणावर अनेक लोक रोज क्रिकेट खेळायचे. पण जेव्हा तेथील खेळपट्टी तयार केल गेली, तेव्हा अनेकांना सरावाला जागाच उरली नाही. मैदानासाठी आरक्षण दिसते पण मैदान दिसत नाही. दुर्दैव म्हणजे यात बदल व्हावा, असे णालाही वाटत नाही. सध्या रत्नागिरीच्या शिवाजी स्टेडियममध्ये मुलांना खेळता येत नाही आणि प्रमोद महाजन क्रीडा संकुल तर बांधकामापासूनच वेगवेगळे उत्सव, शॉपिंग एक्सिबिशन, कार्यक्रम, समारंभ, सभा, मेळावे, फन फेअर यांच्यासाठीच बनवलेय की काय अशी शंका येते. खरतर रत्नागिरीसारख्या मोठ्या वस्तीच्या शहरात वरच्या भागात आणि खालच्या भागात प्रत्येकी एकेक मैदान असायला हवे, जे केवळ खेळाडूंसाठी उपलब्ध असेल.

रत्नागिरीची व्याप्ती पहता रणजी किंवा अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने होतील असे स्टेडियम हवे आहे आणि स्थानिक तरुणांना सराव करता येईल असेही मैदान हवे आहे. हे मैदान फक्त खेळासाठी असेल. तथे सभा, कार्यक्रम होणार नाहीत. तथून खेळाडूंना हुसकावून लावले जाणार नाही. तथे गुरे चरायला येणार नाहीत, थे गवताची कापणी वेळेत होईल. विशेष म्हणजे या मैदानाच्या सुरक्षिततेसाठी नगर परिषद स्वतःहून प्रयत्न करेल. रत्नागिरीतल्या खेळाडूंना उत्तम, सुसज्ज क्रीडांगण उपलब्ध करून देण्यासाठी, मैदानाच्या सुरक्षिततेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत,शी ग्वाही श्री. सावंत यांनी दिली. या प्रकल्पाला इच्छाशक्तीची जोड असल्यामुळे आम्ही ते पूर्णत्वाला नेऊ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment