Friday 11 December 2015

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पुलोत्सव सन्मान पुरस्कार



रत्नागिरी : आर्ट सर्कलतर्फे १२ ते १४ डिसेंबर २०१५ या कालावधीत रत्नागिरीत होणार असलेल्या पुलोत्सवातील तीन मानाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पुलोत्सव सन्मान पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना, सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देवरूखच्या राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडमीला, तर पुलोत्सव तरुणाई पुरस्कार अभिनेते पुष्कर श्रोत्री यांना प्रदान करण्यात येणार आहे. रत्नागिरीतील स्वा. सावरकर नाट्यगृहात हा पुलोत्सव रंगणार आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत `गुण गाईन आवडी` या कार्यक्रमात पुरस्कार दिला जाईल. हाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर श्री. पुरंदरे प्रथच रत्नागिरीत येत आहेत. पुरंदरे यांनी शिवशाहीचा इतिहास संपूर्ण राठी नाला ज्ञात करण्यासाठी आयुष्याचा प्रत्येक क्षण खर्ची घातला. `जाणता राजा` हे हानाट्य केले आणि अनेक सामाजिक संस्थांच्या दतीसाठी त्याचे शेकडो प्रयोग झाले. याच हानाट्याच्या प्रयोगातून िळणाऱ्या निधीतून बाबासाहेबांनी शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प सोडला असून, तोही पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहे.
पुल आणि सुनीताबार्इंच्या दातृत्वाला सला करणारा आणि सामाजिक बांधिलकीचा वसा पुढे नेणाऱ्या संस्थांचा गौरव सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने केला जातो. ही प्रथा रत्नागिरीच्या पुलोत्सवाने पाडली. यंदा हा पुरस्कार देवरूखच्या राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडी या संस्थेस देण्यात येणार आहे. राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडी ७ वर्षांपासून संकटात असणाऱ्या सर्वांना दत करीत आहे. या संस्थेकडे ३० प्रशिक्षित कार्यकर्ते असून १०० जणांचा चमू आहे. स्वतंत्र हिला विभागही आहे. सन्मानपत्र, स्ृतिचिन्ह, अकरा हजार रुपये आणि माली प्रतिष्ठानतर्फे १० हजार रुपये असे संस्थेला दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप आहे. रविवारी (ता. १३) रात्री ९ वाजता या पुरस्काराचे वितरण होईल.
पुलोत्सव तरुणाई पुरस्कार पुष्कर श्रोत्री यांना दिला जाणार आहे. चतुरस्र अभिनयाने व विनोदाच्या आगळ्या शैलीने सर्व रसिकांना आनंद देणाऱ्या व निवेदनाच्या क्षेत्रातही आपल्या बहारदार वक्तृत्वाने जान आणणाऱ्या पुष्कर श्रोत्री यांचा गौरव करण्यात येणार आङे. स्ृतिचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार पुलोत्सवाच्या अखेरच्या दिवशी १४ डिसेंबरला वितरित केला जाईल. रात्री ९ वाजता `हसवासवी` नाट्यप्रयोगादरम्यान पुरस्कार वितरण होईल.

Thursday 10 December 2015

‘लिटिल व्हॉइस ऑफ रत्नागिरी’चे दुसरे पर्व १३ डिसेंबरपासून

छोटे तानसेन’ ‘कानसेनांनास्वरमुग्ध करणार

       रत्नागिरी : कोकणातील बालकलाकारांना ग्लॅमरस दुनियेची अनुभूती मिळावी, या हेतूने गेल्या वर्षापासून लिटील व्हॉइस ऑफ रत्नागिरीही १० ते १६ वयोगटातील मुलांसाठी गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून सीझन २ मधील प्राथमिक फेऱ्यांची सुरुवात येत्या १३ डिसेंबरपासून चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक हॉल येथून होणार आहे.
आकर्षक रंगमंच, नेत्रदीपक प्रकाशयोजना, अत्याधुनिक ध्वनिव्यवस्था यासोबतच नामवंत कालाकारांच्या वाद्यवृंदातील साथीने आपल्या गळ्यातील स्वर आळवण्याची अमूल्य संधी या स्पर्धेच्या निमित्ताने या बालकलाकारांना मिळणार आहे. आयोजक मँगो इव्हेंट्स अँड सेलिब्रेशन्सआणि दिल से क्रिएशन्सया रत्नागिरीतील नामवंत संस्थांमुळे एक अप्रतिम इव्हेंट रत्नागिरीकरांना पाहायला मिळणार आहे.
मोठ्या शहरांमधील कलाकारांना जी संधी मिळते तशी संधी कोकणच्या कलाकारांना मिळावी यासाठी मँगो इव्हेंट्स अँड सेलिब्रेशन्सचे अभिजित गोडबोले नेहमीच प्रयत्नशील असतात. हा संपूर्ण कार्यक्रम रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि उद्योजक किरणशेठ सामंत यांच्या प्रेरणेतून आणि अभिजित गोडबोले यांच्या संकल्पनेतून सादर होत आहे. स्पर्धेची जिल्हास्तरीय अंतिम फेरी ७ जानेवारी २०१६ रोजी रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात होणार आहे.
       चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, मंडणगड येथील स्पर्धकांना या स्पर्धेत सहभागी होता यावे म्हणून स्पर्धेची पहिली निवड फेरी १३ डिसेंबर रोजी चिपळूण येथे लोकमान्य टिळक स्मारक हॉल येथे सकाळी ११ वाजता होईल. रत्नागिरी, संगमेश्वर, देवरूख, लांजा, राजापूर येथील स्पर्धकांसाठी निवड फेरी रत्नागिरीत २५ डिसेंबर रोजी रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये होईल. या दोन्ही फेऱ्यांमधून १० स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यसाठी स्पर्धकाला १ मराठी आणि १ हिंदी गाणे पाठ असणे अपेक्षित असून निवड फेरीच्या वेळी आपल्या आवडीचे कोणतेही गाणे स्पर्धक सादर करू शकतो. या स्पर्धेसाठी रत्नागिरीतील नामवंत कलाकारांची वाद्यवृंद साथ मिळाणार असून अंतिम फेरीसाठी स्पर्धकांकडून आवश्यक सराव करून घेतला जाणार आहे. गतवर्षीप्रमाणेच अंतिम फेरीच्या सोहळ्याला सेलिब्रेटींचीविशेष उपस्थिती लाभणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास  ५००० रुपये, द्वितीय ३००० रुपये, तृतीय २००० रुपये आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अभिजित गोडबोले (९९२२८६९०९९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.