Thursday 18 June 2015

केंद्र सरकारतर्फे योग जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीची निवड

महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांचा समावेश – आंतरराष्ट्रीय योग दिनी भव्य कार्यक्रम



                रत्नागिरी - केंद्र सरकारन राज्यातील सहा जिल्ह्यांची योग जिल्हा म्हणून निवड केली असून त्यारत्नागिरीचा समावेश आहे. येत्या 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन व्य प्रमाणात साजरा करण्याच रत्नागिरी जिल्हा पतंजली योग समितीने ठरविले आहे. सर्वांच्या प्रयत्नांतून संपूर्ण जिल्हा योगमय करण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा,  अशी समितीची अपेक्षा आह. प्रत्यक ग्रामपंयाचतीत पतंजली योग समितीतर्फे 5 ते 7 दिवसांचे मोफत योग शिबिर आयोजित केले जाणार असून योगदिनी जवळच्या शाळा किंवा विविध संस्थांच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी होणऱ्या योग कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा पतंजली योग समितीच्या राज्या कार्यकारिणी सदस्य सौ. राताई जोग यांनी केले आहे.

                हरिद्वार येथील स्वामी रामदेवबाबा यांच्या पतंजली योगपीठांतर्गत पतंजली समिती रत्नागिरीत 2007 पासून योग प्रशिक्षणाचे कार्य करत आहे. पुण्याच्या योगशिक्षिका व रत्नागिरीच्या माहेरवाशीण सौ. वृषाली हळबे यांनी 7 ते 13 म 2007 या कालावधीत दररोज सकाळी 6 ते 8 या वेळेत शिर्के प्रशालेत शिबिर घेतले. त्यातून योगशिक्षकांना आवाहन करून 15 शिक्षकांचे पहिले निवासी प्रशिक्षण शिबिर पावस येथील स्वामी स्वरूपानंद भक्तनिवासात झाले. त्यानंतर जिल्हा योग समिती स्थापन झाली. अध्यक्षपदी सौ. रमा जोग, तर महामंत्री प्रमोद प्रभुदेसाई आणि कोषाध्यक्ष म्हणन शरद्चंद्र रानडे यांची निवड झाली. 23 ते 25 जून 2007 दरम्यान हरिद्वार येथे केंद्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात रत्नागिरीचे प्रतिनिधित्व सौ. जोग यांनी केले. त्यानंतर जुलैमध्ये रत्नागिरीच्या समितीने पहिले योगशिबिर घेतले. पहिली योगकक्षा 1 जून 2008 रोजी अध्यात्म मंदिरात सुरू झाली. आजतागायत त्यात खंड पडलेला नाही. त्यानंतर सातत्याने विविध ठिकाणी मोफत प्रशिक्षण शिबिरे झाली. निरनिराळ्या रोगांवर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि रोगमुक्त राहण्यासाठी जिल्ह्यात पाचशेहून अधिक शिबिरे आयोजित करण्यात आली. प्रत्येक तालुक्यात योगशक्षक कार्यरत आहेत. जिल्ह्यात पंचवीस हजार प्राथमिक सदस्य, अडीच हजार कार्यकर्ता सदस्य,  500 विशिष्ट सदस्य, 5 सन्मानित सदस्य आणि 10 आजीवन सदस्य आहेत. ग्रामीण पातळीवर योग पोहचवण्यासाठी पतंजली योग समिती (अध्यक्ष अॅड. विद्यानंद जोग), भारत स्वाभिमाट्र´स्ट (अध्यक्ष अनंत आगाशे), जिल्हा युवा (युवा प्रभारी प्रभाकर तोडणकर), किसान पंचायत (माधव केळकर),  जिल्हा पतंजली योग समिती (अध्यक्ष अनघा जोशी) अशा 5 संघटना कार्यरत आहेत. दरवर्षी जडीबुटी दिन,  5 जानेवारीला भारत स्वाभिमानचा वाढदिवस, गुढी पाडव्याला राष्ट्रीय महिला दिन, रामनवमीला रामदेवबाबा संन्यास दीक्षा घेतल्याचा वर्धापनदिन,  गुरुपौर्णिमा उत्सव, 23 मार्चला क्रांतिकारकांचा शहीद दिन इत्यादी उत्सव साजरे केले जातात.

योप्रसाराचा एक भाग म्हणून येत्या 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रत्नागिरीत माळनाका येथील विवेक हॉटेलच्या सभागृहात योगाच्या प्रात्यक्षिकांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 6 वाजल्यापासून कार्यक्रम होणार असून मुख्य कार्यक्रम सकाळी 7 ते 7.30 दरम्यान होईल.



चिकित्सालयात मोफत वैद्यकीय सेवा
    रत्नागिरी आणि चिपळूण येथे चिकित्सालय कार्यरत आहेत. तेथे नि:शुल्क वैद्यकीय सेवा दिली जाते. स्वदेशी विक्री केंद्रे सर्व तालुक्यातून सुरू झाली आहेत. हरिद्वारच्या शुद्ध वस्तू व औषधे तेथे उपलब्ध आहेत. जिल्हा, प्रांत, केंद्र अशी त्रिस्तरीय संघटना आणि तहसील, ग्रामपातळीपर्यंत विस्ताराचे काम सुरू आहे. पाच तालुक्यांमध्ये आचार्यकुल सुरू केली जाणार आहेत.

No comments:

Post a Comment