Thursday 5 May 2016

विवेकानंद केंद्रातर्फे रत्नागिरीत १३ मेपासून निवासी युवा सेवा शिबिर



                रत्नागिरी : कन्याकुारी येथील विवेकानंद केंद्रातर्फे १३ ते १५ या कालावधीत रत्नागिरीत निवासी युवा सेवा शिबिर होणार आहे. शिबिर गोगटे-जोगळेकर हाविद्यालयात होईल. १८ वर्षे वयोगटावरील विद्यार्थ्यांना प्रवेश िळेल. 
    शिबिरात १२ रोजी सायंकाळी ५ वाजता नावनोंदणी होईल. १३ ते १५ दरम्यान दररोज प्रातःस्रण, सूर्यनस्कार, योगासने, श्रदान, बौद्धिक व्याख्यान व ंथन, गटचर्चा, खेळ, सायंप्रार्थना, आनंदेळा असा दिनक्र असेल. १६ ला सकाळी ८ वाजता सांगता होईल.
      शिबिरासंदर्भात आयोजक उा जोशी यांनी सांगितले की,  विवेकानंद केंद्र ही एक सेवाभावी संस्था असून ुख्यतः शिक्षण, ग्राविकास, योग, हिला व बालविकास या क्षेत्रात का करते. तािळनाडू,  शान्य आणि पूर्व भारतात केंद्राच्या अनेक शाळा आहेत. युवकांध्ये देशाभिान व सााजिक जबाबदारी यांची जाणीव, जोपासना करण्यासाठी संस्थेचे का चालते. नुष्य निर्ाण व राष्ट्रपुनरुत्थान हे ब्रीदवाक्य असलेल्या या संस्थेचे हे राष्ट्रीय कार्य पुढे नेण्याचे का संस्था करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरीत युवा सेवा शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
         शिबिरासाठी प्रवेशशुल्क २०० रुपये असून नावनोंदणीसाठी उा जोशी (९४२१२३३८६२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बीएडच्या प्रवेशासाठी महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेचे आवाहन



रत्नागिरी : येत्या १२ जून रोजी शिक्षणशास्त्र पदवी (बीएड) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश चाचणीचे अर्ज भरण्याचा प्रारंभ ४ मे रोजी झाला आहे. इच्छुक विद्यार्थिनींनी शिरगाव (रत्नागिरी) येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे.
                केवळ महिलांसाठी असलेल्या या महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थिनी वसतिगृहाची व्यवस्था आहे. शैक्षणिक शुल्कासाठी बँकेचे कर्ज मिळण्याची तसेच शैक्षणिक शुल्क हप्त्यानुसार भरण्याचीही सुविधा आहे. मागासवर्गीय विद्यार्थिनींना सरकारी नियमानुसार शिष्यवृत्ती मिळेल. या महाविद्यालयात शालेय व्यवस्थापन पदविकेचा अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. इच्छुकांना (०२३५२) २३३४९९, २३२१५५, ९४२०२७४११९ या दूरध्वनीवर संपर्क साधल्यास अधिक माहिती मिळू शकेल.

Saturday 23 April 2016

साटवली जिल्हा परिषद शाळेचा रविवारी शतकोत्तर सुवर्ण महोत्सव

लांजा : तालुक्यातील साटवली येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा क्र. १ चा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव रविवारी (ता. २४) साजरा होत आहे.
       शिवकालीन ऐतिहासिक गढी असलेल्या साटवली गावात स्वातंत्र्यापूर्वी ८० वर्षे शाळा सुरू झाली. लोकमान्य टिळकांच्या जन्माच्या वर्षीच सुरू झालेल्या या शाळेत राष्ट्रीय विचाराचे विद्यार्थी तयार व्हावेत, हा उद्देश ठेवण्यात आला होता. इंग्रजांच्या राजवटीत सर्वत्र इंग्रजी शिकविणाऱ्या शाळा असताना साटवलीतील या मराठी शाळेने वेगळा इतिहास निर्माण केला होता. स्वातंत्र्यानंतर ही शाळा जिल्हा परिषदेकडे वर्ग झाली. शाळेचा फारसा इतिहास माहीत नसला, तरी यावर्षी शाळेला दीडशे वर्षे होत आहेत. हा महोत्सव साजरा करण्याकरिता प्रसाद पंडित यांच्या अध्यक्षतेखाली शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. आदेश आंबोळकर उपाध्यक्ष, तर महेंद्र आंबोळकर समितीचे सचिव म्हणून काम पाहत आहेत.
       शाळेत साठ वर्षांपूर्वी शिकणाऱ्या आणि साठी पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार महोत्सवाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. साटवलीच्या बाजारपेठेतील विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात रविवारी दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होईल. आमदार राजन साळवी, शिक्षण समिती सभापती विलास चाळके, जिल्हा परिषद सदस्या वृषाली कुरूप, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, लांजा पंचायत समितीच्या उपसभापती प्रियांका रसाळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, माजी आरोग्य सभापती दत्ता कदम, माजी उपसभापती आदेश आंबोळकर, शिक्षण समन्वय समितीचे संदीप दळवी, लीला घडशी इत्यदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. साटवलीच्या या शाळेविषयी, माजी विद्यार्थ्यांविषयी कोणाला माहिती असेल, तर ती त्यांनी या समारंभाच्या निमित्ताने सादर करावी आणि समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समितीने केले आहे.
...........

(संपर्क – प्रसाद पंडित - ९४२०९१०२०६)

Monday 18 April 2016

संस्कृत समजत नाही हा आपला पराभव – धनंजय चितळे



रत्नागिरी : संस्कृत ही सर्व भारतीय भाषांची मूळ भाषा म्हणजेच जननी आहे. ती समजायला कठीण नाही. तरीही ती आजकाल आपल्याला समजत हा आपला पराभव आहे, असे मत प्रवचनकार धनंजय चितळे (चिपळूण) यांनी येथे व्यक्त केले.
     
रत्नागिरी – गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेच्या
शतक महोत्सव समारंभात प्रवचन करताना धनंजय चितळे.
शेजारी विनायक पोखरणकर सर आणि पुण्याचे पं. शिवराम कृष्ण धायगुडे.
रत्नागिरीच्या गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेच्या शतक महोत्सवानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात पहिल्या दिवशीच्या (ता. १७) दुसऱ्या सत्रात प्रवचन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विनायक पोखरणकर सर आणि पुण्यातील पंडित शिवराम कृष्ण धायगुडे उपस्थित होते. भाषासु मुख्या मधुरा हा चितळे यांच्या प्रवचनाचा विषय होता. ते म्हणाले, संस्कृत शिकण्यासाठी इंग्लंड, जर्मनीतून लोक येतात. भारतात शिकून जातात आणि स्वदेशी जाऊन संशोधन करतात. आपण मात्र संस्कृतकडे दुर्लक्ष करतो. हे दुर्दैवी आहे. संस्कृत ही देशाभिमान जागृत करणारी भाषा आहे. संस्कृत साहित्यामध्ये अभ्यास
करण्यासाठी भरपूर सूत्रे उपलब्ध आहेत. यज्ञवेदी कशी अशावी, ती चौकोन, त्रिकोण इत्यादी आकारात कशी उभारावी. जमिनीचे उतार, चढाव कसे असावेत, या उल्लेख शास्त्रात आहे. त्यावरूनच भूमिती या विषयाचा विस्तार झाला. सध्या भूमितीमध्ये पायथॅगोरस, युक्लिड इत्यादी पाश्चात्यांचे उल्लेख येतात. पण सर्वप्रथम भूमिती शिकविणाऱ्या भारतीय भास्कराचार्यांचा उल्लेख नाही. कोपर्निकस, गॅलिलिओ हे खगोलशास्त्राचे जनक असल्याचे मानले जाते. त्याआधी ज्ञानेश्वरीत 'जैसे सूर्याचे न चालण्यावाचून चालणे' असा उल्लेख आहे. त्याचाच  अर्थ कोपर्निकसच्या कितीतरी आधी ज्ञानेश्वरांना सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी त्याभोवती फिरते, हे माहीत होते.
      संस्कृतमधील भूगोलाच्या अभ्यासाविषयी श्री. चितळे म्हणाले, भूगोलाविषयी विविध विषय हल्ली शाळांमधून शिकविले जातात. ते पाश्चात्य ज्ञानावर आधारित असतात. परंतु पराशर ऋषींनी ढगांचे आवर्त, संवर्त इत्यादी ९ प्रकार सांगितले आहेत. त्यातील ३ प्रकारचे ढग पाऊस पाडतात. हे संशोधन आज उपलब्ध आहे. विहिरी, नद्या, कालवे, मेघ यांच्या गर्जना, पाऊस पाडण्याचे ज्ञान असणाऱ्या सर्वांना नमस्कार केल्याचा उल्लेख रुद्र संहितेते आहे. याचाच अर्थ त्या काळी पाऊस पाडणे आणि थांबवण्याचे ज्ञान असणारे तज्ज्ञ होते. आज हे ज्ञान उपलब्ध नाही. या क्षेत्रात संशोधनाला वाव आहे. संस्कृतमधील ग्रंथांचा अभ्यास करून हे संशोथन करणे शक्य आहे.
      आज माहितीचे मायाजाल उपलब्ध आहे. पण भारतीय आपल्या संस्कृतीमध्ये स्वानुभवीत ज्ञानाला महत्त्व असल्याचे सांगून श्री. चितळे म्हणाले, जे अभ्यासाने प्राप्त होते ते खरे ज्ञान होय. ओपनहायमर आणि रॉबर्ट यांनी प्रथम अणुचाचणी घेतली, तेव्हा त्यांना भगवद्गीतेतील श्लोकाचाच अनुभव मिळाला. सहस्र सूर्य एकाच वेळी आकाश प्रकाशित झाले आहेत, असा उल्लेख गीतेत आहे. तसेच भासल्याचा उल्लेख त्यांनी अशा ब्रायटर दॅन वन थाउजंड सन्स शब्दांत आपल्या पुस्तकात केला आहे. हा अनुभव जयंत नारळीकरांनी आपल्या पुस्तकात लिहिला आहे. आपण सध्या झाडे लावण्याबाबत जनजागृती करतो. पण जुन्या संस्कृत ग्रंथांमध्ये झाडे लावण्याचे आवाहन अनेकदा केलेले आढळते.
      संस्कृतमुळे वाणी शुद्ध होते. भाषा शुद्ध होते. कोण्या एखाद्या वर्णाची नसून सर्वांना खुली असलेल्या या भाषेत गोडवा आहे. संस्कृतमधील हजारो सुभाषिते आजही व्यवहारज्ञान शिकवितात. अशी थोरवी असलेली संस्कृत भाषा शिकण्याचा, अभ्यास करण्याचा आणि ती व्यवहारात आणण्याचा प्रयत्न प्रत्येक भारतीयाने केला पाहिजे, असे श्री. चितळे यांनी सांगितले.
...........