Sunday 13 December 2015

शिवचरित्र म्हणजे राष्ट्रनिर्मितीची गाथा : बाबासाहेब पुरंदरे



रत्नागिरीत आर्ट सर्कलचा पुलोत्सव सन्मान पुरस्कार प्रदान


रत्नागिरी : ``परदेशातील लोकांना स्वतःच्या संस्कृतीचा नव्हे सर्वच गोष्टींचा अभिमान असतो; मात्र आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण अत्तरासारखा वापर करतो; पण त्यांचे रक्त आपल्या शरीरात भिनले पाहिजे. शिवचरित्र हे एका व्यक्तीचे चरित्र नव्हे राष्ट्रनिर्मितीची गाथा आहे. आज त्याची नितांत गरज आहे. चौऱ्याण्णवाव्या वर्षीही मला ते जास्तीत जास्त लोकांर्पंत पोहोचवायचे आहे', असे प्रतिपादन महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.
आपल्यालाही महाराजांचा यथार्थ सन्मान वाटला पाहिजे. मी इतिहासकार, विद्वान, पंडित नाही. बालवर्गात इतिहास शिकवणारा साधा शिक्षक आहे. महाराजांचे सर्वांत जास्त प्रेम कोकणावर होते. त्यामुळेच सुकळवाड (मालवण, सिंधुदुर्ग) येथे जीजी उपरकरांच्या मदतीने शिवसृष्टी उभारण्याचे काम सुरू आहे. मे २०१६ पर्यंत ते पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.
आर्ट सर्कल आणि पुण्याच्या आशय सांस्कृतिक संस्थेतर्फे आयोजित पुलोत्सवास रत्नागिरीत शनिवारपासून (ता. १२ डिसेंबर) स्वा. सावरकर नाट्यगृहात प्रारंभ झाला. त्यावेळी पुलोत्सव सन्मान पुरस्कार प्रदान केल्यावर प्रकट मुलाखतीमध्ये ते बोलत होते. डॉ. सागर देशपांडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
आर्ट सर्कलचे डॉ. रवींद्र गोंधळेकर यांनी बाबासाहेबांना मानपत्र सुपूर्द केले. लेखक अनिल दांडेकर यांनी लिहिलेल्या या मानपत्राची त्यांच्याच आवाजातील ध्वनीफित ऐकवण्यात आली. डॉ. मेधा गोंधळेकर यांनी प्रास्ताविक व सौ. पूर्वा पेठे यांनी सूत्रसंचालन केले. स्वा. सावरकर नाट्यगृहात प्रचंड गर्दीमध्ये हा कार्यक्रम झाला.
श्री. पुरंदरे म्हणाले, "बकिंगहॅम पॅलेसमध्ये १९७८च्या दसऱ्याला गेलो असता तिथल्या तलवारीची आपट्याची पाने ठेवून पूजा करून मुजरा केला. ज्युली हॉर्लंड या तिथल्या वस्तुपाल युवतीने माझ्याकडून सर्व माहिती घेतली. इंग्रजांना स्वतःच्या देशाचा प्रचंड अभिमान असतो. आपल्याकडे बोलण्यात अस्मिता भरपूर आहे; पण कृतीत दिसत नाही. दिलेला शब्द आणि दिलेली वेळ पाळली नाही, हा तर सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे, असे महाराज सांगत. त्यामुळे सद्यस्थितीतही वेळ पाळणे सर्वात महत्त्वाचे आहे."
श्री. पुरंदरे यांनी पुलंविषयी अनेक विनोदी आठवणी सांगितल्या. विद्यार्थी सहायक समितीच्या मदतीसाठी आयोजित राजमाता या एकपात्री प्रयोगावेळी दाखवलेली शिस्त, गप्पांमधील अनेक किस्से त्यांनी ऐकवले. एका व्यक्तीने तुम्ही देशपांडे म्हणजे देशस्थ की कायस्थ असे विचारता पुलंनी सांगितले त्रयस्थ असे सांगितले. असे काही किस्से ऐकवले. स्वा. सावरकर, ज्ञानेश्वरीचेही काही संदर्भ सांगितले.
ते म्हणाले, "१० खंडांतील शिवचरित्र प्रसिद्ध झाल्यानंतर १९५८ मध्ये पु. ल. देशपांडे यांचे मला पत्र आले. मुंबई-दिल्ली प्रवासामध्ये हे चरित्र वाचून काढले आणि तिथून पुढे पुलंचा व माझा परिचय झाला. पुल तथा भाई व सुनीताबाई या शिस्तबद्ध दांपत्याशी परिचय वाढत गेला. एकदा इंग्लडच्या दौऱ्यावर जाताना पुलंनी मला तिथली सार्वजनिक प्रसाधनगृहे आणि बँक पाहण्यास सांगितले. पुलंची निरीक्षणशक्ती प्रभावी होती. विनोदी स्थायीभावामुळे त्यांचा विनोद उच्च दर्जाचा होता, उथळ नव्हता. ते सहज सोपा विनोद करायचे. एकदा सिंहगडावर आम्ही पायी गेलो. गडावर ते बसले आणि मला म्हणाले, आमच्या घरी संदेश पाठवा, आम्ही किल्ल्यावर सुखरूप पोहोचलो.

कार्यक्रमस्थळी पोलिस बंदोबस्त
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्यक्रमाकरिता स्वा. सावरकर नाट्यगृहात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाकरिता शहरातील रसिकांसह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेसह विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्तेही उपस्थित होते. नियोजित वेळेनुसार कार्यक्रम ६.५९ ला सुरू झाला आणि ६.१९ वाजता बाबासाहेबांची मुलाखत सुरू झाली. याबद्दल बाबासाहेब आणि डॉ. देशपांडे यांनी आर्ट सर्कलचे विशेष कौतुक केले.


Friday 11 December 2015

खवणे येथील खवणेश्वराचा जत्रोत्सव सुरू




वेंगुर्ले – तालुक्यातील खवणे येथील खवणेश्वर आणि म्हापण येथील श्री देवी सातेरीमातेचा वार्षिक जत्रोत्सव आज (ता. ११ डिसेंबर १०१५) मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे.
नवसाला पावणारा व भक्तांच्या हाकेला धावणारा असा खवणेश्वराचा नावलौकिक सर्वदूर आहे. वेंगुर्ले तालुक्यातील खवणे समुद्र किनारपट्टीवर जाताना वाटेत श्री देव  खवणेश्वराचे भव्य दिव्य मंदिर आहे. खवणे किनारपट्टीवर फिरायला जाणारे-येणारे पर्यटक किंवा अन्य लोक खवणेश्वराचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. खवणेश्वोराचा वार्षिक जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. आज सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. रात्री पालखी सोहळा पाहण्यास व फटाक्यांची आतषबाजी बघण्यासाठी अलोट भक्तांची गर्दी लोटते.
खवणेश्वराची बहीण म्हापण येथील श्री देवी सातेरी आपल्या भावाला भेटण्यासाठी पालखीतून ढोलताशांच्या गजरात आज खवणेश्वराच्या वार्षिक जत्रोत्सवादिवशी सायंकाळी उशिरा मंदिराच्या परिसरात अंगणात येते. ती खवणेश्वराचा जत्रोत्सव पाहण्यासाठी दरवर्षी येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्री देवी सातेरीमातेची पालखी रात्रभर श्री देव खवणेश्वोच्या मंदिराच्या अंगणात ठेवली जाते. तेथेच रात्री दशावतारी नाटक सादर केले जाते. खवणे गावातील महिला पालखीत स्थानापन्न झालेल्या श्री सातेरीदेवीची ओटी भरतात. भक्तमंडळी देवीचे दर्शन घेतात.
जत्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सातेरीदेवीची पालखी खवणे गावातून ढोलताशांच्या गजरात पुन्हा म्हापण येथील श्री देवी सातेरीदेवीच्या मंदिरात  जाते. हाही सोहळा पाहण्यासाठी भक्तांचा महासागर लोटतो.

(आबा खवणेकर – ९४२३८३२८८६)
 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पुलोत्सव सन्मान पुरस्कार



रत्नागिरी : आर्ट सर्कलतर्फे १२ ते १४ डिसेंबर २०१५ या कालावधीत रत्नागिरीत होणार असलेल्या पुलोत्सवातील तीन मानाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पुलोत्सव सन्मान पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना, सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देवरूखच्या राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडमीला, तर पुलोत्सव तरुणाई पुरस्कार अभिनेते पुष्कर श्रोत्री यांना प्रदान करण्यात येणार आहे. रत्नागिरीतील स्वा. सावरकर नाट्यगृहात हा पुलोत्सव रंगणार आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत `गुण गाईन आवडी` या कार्यक्रमात पुरस्कार दिला जाईल. हाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर श्री. पुरंदरे प्रथच रत्नागिरीत येत आहेत. पुरंदरे यांनी शिवशाहीचा इतिहास संपूर्ण राठी नाला ज्ञात करण्यासाठी आयुष्याचा प्रत्येक क्षण खर्ची घातला. `जाणता राजा` हे हानाट्य केले आणि अनेक सामाजिक संस्थांच्या दतीसाठी त्याचे शेकडो प्रयोग झाले. याच हानाट्याच्या प्रयोगातून िळणाऱ्या निधीतून बाबासाहेबांनी शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प सोडला असून, तोही पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहे.
पुल आणि सुनीताबार्इंच्या दातृत्वाला सला करणारा आणि सामाजिक बांधिलकीचा वसा पुढे नेणाऱ्या संस्थांचा गौरव सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने केला जातो. ही प्रथा रत्नागिरीच्या पुलोत्सवाने पाडली. यंदा हा पुरस्कार देवरूखच्या राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडी या संस्थेस देण्यात येणार आहे. राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडी ७ वर्षांपासून संकटात असणाऱ्या सर्वांना दत करीत आहे. या संस्थेकडे ३० प्रशिक्षित कार्यकर्ते असून १०० जणांचा चमू आहे. स्वतंत्र हिला विभागही आहे. सन्मानपत्र, स्ृतिचिन्ह, अकरा हजार रुपये आणि माली प्रतिष्ठानतर्फे १० हजार रुपये असे संस्थेला दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप आहे. रविवारी (ता. १३) रात्री ९ वाजता या पुरस्काराचे वितरण होईल.
पुलोत्सव तरुणाई पुरस्कार पुष्कर श्रोत्री यांना दिला जाणार आहे. चतुरस्र अभिनयाने व विनोदाच्या आगळ्या शैलीने सर्व रसिकांना आनंद देणाऱ्या व निवेदनाच्या क्षेत्रातही आपल्या बहारदार वक्तृत्वाने जान आणणाऱ्या पुष्कर श्रोत्री यांचा गौरव करण्यात येणार आङे. स्ृतिचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार पुलोत्सवाच्या अखेरच्या दिवशी १४ डिसेंबरला वितरित केला जाईल. रात्री ९ वाजता `हसवासवी` नाट्यप्रयोगादरम्यान पुरस्कार वितरण होईल.