Saturday 6 January 2018

इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी टिळकांनी समाजाचे प्रबोधन केले – चारुदत्त आफळे


कीर्तनसंध्या तृतीय पुष्प

      रत्नागिरी : आद्य क्रांतिकारक फडके यांच्या लाठीकाठीच्या वर्गात टिळकांनी प्रशिक्षण घेतले होते. पण मर्यादित सैन्याने इंग्रजांना हरवणे शक्य नसल्याने टिळकांनी फडके यांच्या लढ्यात भाग घेतला नाही. पण टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू करून हिंदूंमध्ये इंग्रजांविरोधात रणशिंग फुंकले. क्रांतिकारक तयार करण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि वृत्तपत्रे सुरू करून लढा उभारला, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी केले.


      येथील स्व. महाजन क्रीडा संकुल येथे कीर्तनसंध्या आयोजित राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाच्या तिसर्यात दिवशी शुक्रवारी (दि. ५ जानेवारी) त्यांनी टिळक चरित्र मांडले. टिळकांच्या कॉलेजजीवनातील काही किस्से बुवांनी रंजकपणे सांगितले. महाविद्यालयात सोवळ्याने भोजन, फी भरता येत नसल्याने आगरकरांना भाषांतराचे करावे लागलेले काम आणि त्यामुळे अभ्यासासाठी त्यांच्याकडे नसलेला वेळ, अशा वेळी छत्रे गुरुजींनी आगरकरांच्या परीक्षेच्या फीचे भरलेले पैसे, इंग्रजांशी लढा कसा द्यावा, याची गणिती बैठक निश्चित असलेला गणिताचा अभ्यास, वर्षभर व्यायाम करून त्यांनी कमावलेली शरीरयष्टी, मात्र वर्षभर वर्ग चुकवला नाही. परीक्षाही दिली पण सर्व उत्तरे येऊनही पास होण्याएवढी उत्तरेच लिहिली नाहीत, अशा अनेक किश्श्यांचा त्यात समावेश होता. गुजरातेतील द्वारकेजवळच्या प्रभासपट्टण येथील जातीय दंग्यांमध्ये इंग्रजांनी तेल ओतले आणि तेव्हाच भारताची दोन देशांत विभागणी होणार हे टिळकांच्या लक्षात आले. टिळकांनी वृत्तपत्रांतून इंग्रजांवर टीका केली. शिवाय इंग्रजांच्या दुहीच्या या कटाला शह देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून समस्त हिंदूंना एकत्र आणले. रायगडावर जाऊन शिवजयंतीनिमित्त लाठीकाठीचे खेळ, कवायती सुरू केल्या. महात्मा फुले यांनी महाराजांचे समाधिस्थळ शोधून स्वच्छता केली. उत्सव समिती नेमली. तेथेच उत्सव सुरू केला, असेही श्री. आफळे यांनी सांगितले.
      बुवांनी सांगितले की, स्वातंत्र्य मिळण्यासाठी टिळकांनी समाजाची मोट बांधली. टिळक कीर्तन संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी कीर्तनकारांना राम, श्रीकृष्ण आणि पौराणिक कीर्तनासह शिवचरित्र उलगडून राष्ट्रभक्तीची ज्योत पेटविण्याची विनंती केली. तेव्हापासून राष्ट्रीय कीर्तन सुरू झाले, क्रांतिकारक तयार झाले आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने बाजी मारली.
      तिसरे युद्ध अटळ असल्याचे बुवांनी सांगितले. भारतावर आक्रमणासाठी चीन, पाकिस्तान व पाश्चिरमात्य देश सज्ज आहेत. त्यासाठी हिंदूंनीही बलदंड झाले पाहिजे, रोज व्यायाम, सूर्यनमस्कार, ध्यानधारणा केली पाहिजे. सीमेवर युद्धासाठी सैन्यासोबत पोलिसांनाही जावे लागेल. त्यावेळी आपणच आपले संरक्षण करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. आपल्या शाळांमधील कवायत म्हणजे ज्येष्ठांसाठीचा व्यायाम झाला आहे. याबाबत शासनाला तीन वेळा कळवले आहे. शालेय मुलांना लाठीकाठी, जोर-बैठका, गिर्यारोहणाचे प्रशिक्षण दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
      आफळेबुवांनी सांगितले की, आहारातला विवेक महत्त्वाचा आहे. चमचमीत, उग्र खाण्यातून काहीही फायदा नाही. पूर्वी राजांना युद्धावर जाताना मांसाहाराची परवानगी धर्मानेच दिली होती. पण आवश्यकता नसताना तो करू नये. आयुष्यभर आध्यात्मिक साधना व शाकाहारी दधिची ऋषींच्या हाडांच्या शस्त्राने वृत्रासुराला मारले, हे लक्षात घेतले पाहिजे. आत्मिक सुखाकडे वळण्यासाठी दररोज ध्यानसाधना हवी. त्यासाठी दृढ बुद्धी (धृती) ठेवली पाहिजे. शरीर हे भाड्याचे घर आहे आणि आतील आत्मा हे स्वतःचे घर. त्या दिशेने वाटचाल करायला हवी, असेही श्री. आफळे यांनी सांगितले. पूर्वरंगात त्यांनी टिळकांच्या गीतारहस्य ग्रंथातील काही अध्यायांचे निरूपण आपल्या ओघवत्या शैलीत केले.
      राजस सुकुमार, जनसेवेपायी काया झिजवावी, आदी पदे म्हणून बुवांनी कीर्तनात रंगत आणली.
...........



कीर्तनप्रेमींच्या वाहनांची पार्किंगमध्ये झालेली दाटी

Friday 5 January 2018

प्रजासत्ताक भारतासाठी वासुदेव बळवंत फडक्यांनी सर्वप्रथम बंड केले – चारुदत्त आफळे

कीर्तनसंध्या – द्वितीय पुष्प

      रत्नागिरी : इंग्रजांनी इतिहासाचे लबाडपणे लेखन केले. पेशवाई परत येण्यासाठी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी बंड केले, ते दरोडे घालत होते, असा खोटा इतिहास लिहून ठेवला. त्यामुळे काही इतिहासकार तेच पुढे लिहून समाजात तेढ निर्माण करतात. भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र व्हावे याकरिता फडके यांनी बंड केले. यांच्या लढ्याला त्यांचे सहाध्यायी महात्मा फुलेंच्या कष्टकरी, शेतकरी, माळकरी वर्गाने मदत केली. सुधारकाचे नाव घेऊन भांडणे सोपे आहे. पण एकत्र आणणे हे व्रत आहे. फुले यांनी सांगितले समाजाने सत्यशोधक व्हावे. ते समजण्यासाठी खरा इतिहास जाणून घ्यावा, असे सूचक प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त आफळेबुवा यांनी केले.
      येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात कीर्तनसंध्यातर्फे काल (दि. ४ जानेवारी) दुसर्याा दिवशीच्या कीर्तनात बुवांनी क्रांतिकारक फडके व त्यांचे बलिदान याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, फडके यांच्या आजोबांनी त्यांना लहान वयात शिवछत्रपतींचे चरित्र शिकवले. तेव्हापासूनच त्यांच्या मनात इंग्रजांविरोधात चीड निर्माण होत होती. दुष्काळ पडला तेव्हा ख्रिश्चचन लोक हिंदू मुले घेऊन धर्मांतर करत होती. धर्मांतराच्या या वादळात फडके यांनी हिंदू असोसिएशन स्थापन केली. त्यात हिंदूंसह अन्य धर्मीयांच्या मुलांनाही जागा दिली, पण त्यांचे धर्मांतर केले नाही. इंग्रजांची शिक्षणपद्धती नोकरशाही निर्माण करत होती. त्यांनी रेल्वे आणली ती सैन्य वेळेवर पोहोचण्यासाठी. मात्र रेल्वेत बसायला मिळावे म्हणून भारतीय नवस करत होते. गुलामाला गुलामी हेच भूषण वाटत होते. अशा काळात फडके यांनी दहा वर्षे सैन्याच्या लेखा विभागात नोकरी केली. तेथील इत्थंभूत माहिती मिळवली. त्यांच्या मनात ब्रिटिशांविरुद्धचा असंतोष खदखदत होता. म्हणूनच त्यांच्या मनात बंड करायचे ठरत होते. त्याची तयारी त्यांनी चालविली होती. इंग्रजी, जर्मन, रशियन भाषा त्यांनी शिकून घेतल्या. स्वातंत्र्यासाठी वेळ पडल्यास अन्य देशांची मदत घ्यावी लागली, तर उपयोगी ठरावे, म्हणून या भाषा त्यांनी अवगत केल्या. त्यातून देशभक्तीने ते किती प्रेरित होते, स्वातंत्र्याची त्यांच्या मनात किती आस होती, त्यासाठी त्यांनी किती तयारी चालविली होती, ते लक्षात येते. नोकरीत असताना त्यांची आई आजारी पडली व साहेबाने सुट्टी दिली नाही आणि संघर्षाला ठिणगी पडली. त्यांनी दौलतराव रामोश्याच्या नेतृत्वाकाली रामोशांना एकत्र केले. ब्रिटिशांनी अनेकांची वतने रद्द केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. रामोशी त्यापैकीच होते. त्यांच्याकडून किल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी काढून घेण्यात आली होती. इतकेच नव्हे, तर पारधी, कातकरी, वडार अशा अनेक जमातींची नावे लुटारूंच्या यादीत समाविष्ट करण्यात आली होती. कोठेही दरोडा पडला, तरी याच जमातीच्या लोकांना अटक केली जात असे. त्यामुळे अशा जमाती ब्रिटिशांच्या विरोधात होत्या. त्यांना फडक्यांनी संघटित केले. इंग्रजांच्या चांगल्या बंदुका खराब झाल्या, असे सांगून इंग्रजांच्याच कामगारांनी फडके यांना त्या मिळवून दिल्या. स्वराज्यासाठी लागणार्याा पैशांसाठी दरोडे घातले. पण जे सावकार पिळवणूक करत होते, त्यांच्यावरच दरोडे घातले व फक्त निम्मे पैसे, सोने-नाणे मिळवले. पण हे स्वराज्यासाठी घेत आहे, स्वराज्य मिळाले की परत देऊ अशी पावतीही फडके देत होते. स्त्रिया, मुलांना त्रास देऊ नये, अशी कडक नियमावली बनवली होती.
      फडके लढवय्ये होते. तलवार दातात पकडून गिर्यारोहण करणे, घोडेस्वारी, दांडपट्टा दातात धरून दरी उतरणे, बंदुका चालवणे अशा अनेक शारीरिक कसरतींमध्ये ते माहीर होते. बंदुका चालवण्याचे व लाठीकाठीचे वर्ग ते घेत होते. इंग्रजांविरोधात लढायला सैनिक तयार करत होते. त्यांच्या वर्गात लोकमान्य टिळक हेसुद्धा होते. लढ्यामध्ये ब्रिटिश पोलिसांना फडके यांना पकडणे शक्य झाले नाही. तेव्हाच्या महाराष्ट्रातील २१ पैकी ७ जिल्ह्यांवर फडक्यांनी वर्चस्व निर्माण केले. अवघ्या पाच महिन्यांत ही किमया त्यांनी साधली. पाच महिन्यांनंतर कर्नल डॅनियल या लष्करी अधिकार्यारने त्यांना पकडले. फडके यांना पकडण्यासाठी त्याने ४ हजार रुपयांचे इनाम जाहीर केले होते व त्याला उत्तर म्हणून फडके यांनी मुंबईच्या गव्हर्नरचे मुंडके कापेल त्याला ९ हजार रुपयांचे इनाम जाहीर केले. यामुळे इंग्लंडच्या वृत्तपत्रातही फडके यांचा डंका वाजला. पकडल्यानंतर कोर्टाने त्यांची एडनच्या तुरुंगात रवानगी केली. तेथे क्षयाने त्यांचा २३ फेब्रुवारी १८७९ रोजी मृत्यू झाला. पण फडके यांच्या वीरमरणाने अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली. वासुदेव बळवंत फडके लुटारू होते, असा अपप्रचार केला जात असे. फडक्यांनी लूट केली हे खरे, पण ती स्वराज्यासाठी नव्हे. त्यांच्या बाजूने लढणाऱ्या भारतीय
      नको देवराया अंत आता पाहू१८७९ चे साल वासुदेवाचे वीर फिरतात, धाव धाव दत्ता आदी पदे बुवांनी ऐकवली. त्यांना तालवाद्यसाथ सौ. आदिती चक्रदेव, महेश सरदेसाई यांनी केली. मधुसूदन लेले, हेरंब जोगळेकर, उदय गोखले व प्रथमेश तारळकर यांची वाद्यसाथ मिळाली.

.........................



कीर्तनात रंगून गेलेल्या चारुदत्त आफळेबुवांच्या विविध भावमुद्रा

Thursday 4 January 2018

योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंदांची राष्ट्रभक्ती अलौकिक – चारुदत्त आफळे

रत्नागिरीत कीर्तनसंध्या महोत्सवाला थाटात प्रारंभ

रत्नागिरी : जागतिक धर्मसभेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी फक्त तीन मिनिटे भाषण केले. माझ्या बंधू-भगिनींनो हे शब्द आधीच्या वक्त्यांनीही म्हटले होते. परंतु स्वामींनी हे शब्द उच्चारताच भाव पोहोचवणारा अनुभव सार्‍यांनी घेतला व विजेची लाट गेल्यासारखे वाटून सारे थरथरत होते. अनेकांचे डोळे डबडबले, हा सार्वत्रिक अनुभव असल्याने टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. यामुळेच स्वातंत्र्यपूर्व काळात आध्यात्मिक राष्ट्रभक्त आणि योद्धा संन्यासी असा नावलौकिक विवेकानंदांनी मिळवला. त्यांची राष्ट्रभक्ती अलौकिक होती, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी केले.
कीर्तनसंध्या संस्थेतर्फे येथील महाजन क्रीडासंकुलात कालपासून सुरू झालेल्या कीर्तन महोत्सवात ते बोलत होते.
राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे यांच्या कीर्तनसंध्या महोत्सवाला कालपासून (दि. ३ जानेवारी) स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे दिमाखात प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महारराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष राहुल पंडित, पितांबरी उद्योग समूहाचे प्रदीप प्रभुदेसाई, मथुरा एक्झिक्युटिव्हचे शांताराम देव, किर्तनसंध्याचे अध्यक्ष अवधूत जोशी, सामाजिक कार्यकर्ते माधव कुलकर्णी उपस्थित होते. अवधूत जोशी यांनी बुवांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. महोत्सवात आफळेबुवा दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ही कीर्तने होणार आहेत. कीर्तनाच्या पूर्वरंगात लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या गीतारहस्यावरचे विवेचन आफळेबुवा पाचही दिवस करणार आहेत. त्यानंतर उत्तररंगात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, चापेकर बंधू, महात्मा फुले, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, मदनलाल धिंग्रा, बिपिनचंद्र पाल, खुदीराम बोस, फडके, बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीकारी कार्याचा आलेख मांडणार आहेत.
     
काल आफळेबुवांनी स्वामी विवेकानंदांचा विषय उत्तररंगासाठी घेतला होता. ते म्हणाले, स्वामींनी अमेरिकेत ११ सप्टेंबरला धर्मसभेत जे भाषण दिले त्यानंतर जगभरातील लोक त्यांच्या प्रेमात पडले. अमेरिकेत हेल्पलाईनचा नंबर ९११ त्यावरून दिला गेला. हे खोडून काढण्यासाठी याच तारखेला भ्याड हल्ला करण्यात आला होता. अमेरिकेतून परत येताना बोटीमध्ये हिंदू धर्माची व ग्रंथांची निंदा करणार्‍या व्यक्तीला स्वामींनी दोन हातांत उचलले आणि माझ्या हिंदुस्थानची निंदा करणार्‍याला समुद्रात फेकून देईन, असे ताडकन सांगितले. ब्रिटनमध्येही स्वामींनी हिंदू धर्मसंस्कृती कशी श्रेष्ठ आहे, याची भाषणे दिली. स्वतःचा धर्म श्रेष्ठ आहे हे सांगण्याकरिता दुसर्‍याला वाईट म्हणण्याची गरज नाही, असे सांगणारे स्वामी होते. यामुळेच स्वामींची सार्धशती जगभरातील ५१ देशांनी विविध कार्यक्रमांनी साजरी केल्याचा दाखला आफळेबुवांनी दिला.
बुवांनी पूर्वरंगात गीतारहस्य या अवघड ग्रंथावर भाष्य केले. हा ग्रंथ ६५० पानांचा असून तो समजण्यास खूप कठीण आहे. मात्र लोकमान्य टिळकांनी तो स्वातंत्र्यपूर्व काळात लिहून देशभक्ती वाढवण्यासाठी व स्वातंत्र्य मिळवण्यासाठी योगदान केले. समाजात मूर्ख, अविचारी व इंग्रजाळलेल्या शिक्षणामुळे हिंदू धर्माला आणि गीताग्रंथाला नावे ठेवणार्‍या लोकांवर त्यांनी टीका केली. मुस्लिम, ख्रिस्ती लोकांचा रोजा, फास्ट म्हणजे उपवास कसा कडक असतो, हे हिंदू सांगतात. पण एकादशीचा उपाससुद्धा करता येत नाही, अशा शब्दांत त्यांनी आसूड ओढला. हे सारे इंग्रजी शिक्षण पद्धतीमुळे घडत आहे. रविवार किंवा मे महिन्याची सुट्टी इंग्रजांनी सुरू केली. कारण त्यांना चर्चमध्ये जायचे असते आणि उन्हाळा ते सहनच करू शकत नाहीत. हिंदूंनी स्वतःच्या संस्कृतीचा आणि हिंदुस्थानचा आदर केलाच पाहिजे, असे बुवांनी ठामपणे सांगितले.
योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंदांचा जीवनपट छोट्या छोट्या गोष्टी, गीते, पोवाड्यातून बुवांनी उलगडला. स्वामी लहानपणी जत्रेत गेले असता घोडागाडीखाली येणार्‍या लहान बालकाला वाचवताना हातातील शंकराची पिंडी त्यांनी फेकली होती. त्यामुळे ते घाबरले, परंतु आईने, तू माणसात श्री शंकर पाहिलास, असे सांगितले. मोठेपणे ते रामकृष्ण परमहंस यांच्याकडे साधना शिकत होते. पाच वर्षांची साधना झाली. आता मला निर्विकल्प समाधी द्या, असे स्वामींनी गुरूंना सांगितले. त्या वेळी गुरूंनी त्यांना हिंदुस्थानातील गरिबी, बेकारी आणि भरकटलेली जनता यांना मार्ग दाखव, अशी सूचना केली. मी या देहात नसलो तरी तुझ्यासोबत आहे, असे मार्गदर्शन केले. ही जोडी सद्गुरु-सत्शिष्याची व लोकप्रबोधन करणारी एकमेव होती.
रामकृष्ण परमहंसांच्या आदेशाप्रमाणे स्वामी विवेकानंद भारतभ्रमणास निघाले. महाराष्ट्रात आल्यावर लोकमान्य टिळकांची भेट त्यांनी घेतली. समाजहिताची काळजी करणार्‍या या दोन सुधारकांची बहुधा हिंदूंना एकत्रित आणणारा विराट उत्सव सुरू करण्यासंबंधी चर्चा झाली असावी. या भेटीनंतरच टिळकांनी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात सुरू केला, असे आफळेबुवांनी सांगितले.
आफळेबुवांच्या कीर्तनाची सांगता सत्राणे उड्डाणे ही मारुतीची आरती व राष्ट्रगीताने झाली. या कीर्तनात बुवांनी कृष्ण माझी माता, विश्‍वनाथ हे नाव पित्याचे, पद्मनाभा नारायणा, अनादि निर्गुण, देव नाही देव्हार्‍यात, परिषदेचा तो दिन आला आदी पदे सुरेखपणे ऐकवली. त्यांना अजिंक्य पोंक्षे याने संगीतसाथ केली. तालवाद्यसाथ महेश सरदेसाई यांनी केली. मधुसूदन लेले, हेरंब जोगळेकर, उदय गोखले व प्रथमेश तारळकर यांची वाद्यसाथ मिळाली.
...........

 



Wednesday 13 December 2017

यावर्षीच्या कीर्तनसंध्येत उलगडणार १८५७ पासून १९२० पर्यंतचा इतिहास


              
 रत्नागिरी : रत्नागिरीत यावर्षीच्या कीर्तनसंध्या महोत्सवात १८५७ पासून १९२० पर्यंतचा ऐतिहासिक कालखंड राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त आफळेबुवा उलगडणार आहेत. येत्या ३ ते ७ जानेवारी २०१८ या काळात हा महोत्सव होणार आहे.
      रत्नागिरीत सुरू असलेल्या कीर्तनसंध्या उपक्रमाचे यंदाचे सातवे वर्ष आहे. रत्नागिरीच्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलात ३ ते ७ जानेवारी या कालावधीत दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ही कीर्तने होणार आहेत. गेल्या सात वर्षांत संभाजी महाराज, शिवाजी महाराज, सुभाषचंद्र बोस, पेशवाईतील मराठशाहीची देशव्यापी झुंज, स्वराज्याकडून साम्राज्याकडे, १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध या विषयांवर कीर्तने झाली. यावर्षी क्रांतीपर्वाचा दुसरा भाग म्हणजेच १८५७ ते १९२० या कालखंडातील इतिहास कीर्तनाद्वारे मांडला जाणार आहे. कीर्तनाच्या पूर्वरंगात लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या गीतारहस्यावरचे विवेचन आफळेबुवा करणार आहेत. उत्तररंगात १८५७ ते १९२० या कालावधीतील लोकमान्य टिळक, चापेकर बंधू, महात्मा फुले, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, मदनलाल धिंग्रा, बिपिनचंद्र पाल, खुदीराम बोस, फडके, बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीकारी कार्याचा आलेख मांडला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी इतिहासाच्या शिक्षणाची ही पर्वणी आहे, असे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे. महोत्सवात हेरंब जोगळेकर (तबला), मधुसूदन लेले (हार्मोनियम), राजा केळकर (पखवाज), उदय गोखले (व्हायोलिन), उदयराज सावंत (ध्वनिव्यवस्था) यांची साथसंगत लाभणार आहे.
      चारुदत्तबुवा आफळे यांचे वडील गोविंदबुवा आफळे यांच्या शताब्दीच्या निमित्ताने एक संकेतस्थळ सुरू करण्यात येणार असून त्याचा प्रारंभ कीर्तनसंध्या महोत्सवात होईल. महोत्सवात जमिनीवरील बैठकव्यवस्था नेहमीप्रमाणेच मोफत असेल. खुर्च्यांची व्यवस्थाही करण्यात आली असून त्याकरिता संपूर्ण महोत्सवाची देणगी सन्मानिका ३०० रुपयांना उपलब्ध होईल. या सन्मानिकांसाठी अवधूत जोशी (मानस जनरल स्टोअर्स, माळ नाका, रत्नागिरी. ९०११६६२२२०, ८६६८२६३४९६), नितीन नाफड (सोहम मेडिकल, पोतदार हॉस्पिटल, शिवाजीनगर. ९५०३९४६६१७), उमेश आंबर्डेकर (धन्वंतरी आयुर्वेद, मारुती मंदिर. ९४२३२९२४३७, ९८५०८२४३७), गौरांग आगाशे (आगाशे यांचे दुकान, साळवी स्टॉप. ९७३०३१०७९९), रत्नाकर जोशी (डिक्सन सप्लायर्स, जिल्हा परिषद कार्यालयाजवळ. ९०७५०५२६१३, ९४२२०५२६१३), योगेश हळबे (गुरुकृपा रेडिओ हाऊस, टिळक आळी. ९८९०८२७००६) आणि मकरंद करंदीकर (करंदीकर उपाहारगृह, शिवाजीनगर. ९४२३०४७०४७) यांच्याकडे उपलब्ध होतील. आहेत. महोत्सवाच्या ठिकाणीही दैनंदिन देणगी सन्मानिका उपलब्ध होणार आहेत.
      महोत्सवाच्या आवारात वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून दररोज रात्री कीर्तन संपल्यानंतर मजगाव, कुवारबाव आणि नाचणे मार्गावर शहर वाहतुकीच्या बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे.


Friday 17 November 2017

कोट येथे रविवारी राणी लक्ष्मीबाई जयंती

            लांजा :  झाशीची राणी लक्ष्मीबाईची जयंती कोट (ता. लांजा) येथे येत्या रविवारी (दि. १९ नोव्हेंबर) साजरी करण्यात येणार आहे. कोटे हे राणी लक्ष्मीबाईचे सासरचे मूळ गाव आहे.
      जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दुपारी ३ वाजता कार्यक्रमाला प्रारंभ होईल. रत्नागिरीच्या कऱ्हाडे ब्राह्मण संघाने लक्ष्मीबाईच्या जयंतीच्या निमित्ताने निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. परिसरातील शाळांमधील विद्यार्थी त्यात सहभागी होणार आहेत. त्या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्र देऊन गुणगौरव करण्यात येईल. निमंत्रित मान्यवर यावेळी आपले विचारही व्यक्त करतील. राज्य शासनातर्फे राणीचे स्मारक उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांसमवेत त्याबाबतच्या बैठका झाल्या आहेत. स्मारक उभारण्याच्या दृष्टीने झालेल्या प्रगतीविषयीची माहिती यावेळी देण्यात येईल. पुण्याच्या सौ. रोहिणी माने-परांजपे सादर करणार असलेल्या राणी लक्ष्मीबाईच्या जीवनावर आधारित कीर्तनाने जयंती समारंभाचा समारोप होईल.
      कोट येथे बाळूकाका नेवाळकर यांच्या निवासस्थानी होणार असलेल्या या समारंभाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन राणी लक्ष्मीबाई जयंती समिती आणि कोट येथील ग्रामस्थांनी केले आहे.
............

(संपर्क – राजू नेवाळकर, (०२३५१) २३३५०४, ९२७०९६३५७४)

Monday 21 August 2017

कोकण मीडिया दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवावे

रत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या गेल्या वर्षीच्या पहिल्याच दिवाळी अंकाला मुंबईतील महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाचा सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार मिळाला. तसाच उत्कृष्ट दिवाळी अंक यावर्षीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
       कोकणाला स्वतःचा इतिहास आणि संस्कृती आहे. इतिहासाचे साक्षीदार असलेले अनेक प्राचीन वाडे, किल्ले आणि वास्तू कोकणात आहेतपालघर जिल्ह्यातील ६३२ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला जव्हारमधील जुना राजवाडा, चारशे वर्षांचा वसईचा किल्ला, मुंबईतील सव्वाशे वर्षे पूर्ण करणाऱ्या महापालिका आणि छत्रपती शिवाजी टर्मिनससारख्या इमारती, रत्नागिरीचा शतकोत्सवी थिबा राजवाडा, रत्नागिरीचा थिबा राजवाडा, चारशे वर्षांपूर्वीचा २५०० चौरस फूट विस्ताराचा तीनमजली २७ खोल्यांचा रहस्यमय मांडणीचा प्रशस्त आणि शीतलता देणारा सिंधुदुर्ग किल्ल्यासारखा मालवणातील भक्कम कुशेवाडा, नेरूरच्या चौपाटीवरचा वाडा, सावंतवाडीचा राजवाडा अशा अनेक वास्तू सांगता येतील. अशा वास्तूंचा अभ्यास आपल्याला संस्कृती आणि परंपरा उलगडवून सांगतो.
          अशाच काही वास्तूंचा ऐतिहासिक, अभियांत्रिकी, स्थापत्यशास्त्रीय अशा विविध अंगांनी परिचय यावर्षीच्या दिवाळी अंकात करून दिला जाणार आहे. आपणही कोकणातील आपल्या परिसरातील किंवा आपण माहिती देऊ शकाल, अशा वास्तूची परिपूर्ण माहिती आणि छायाचित्रे पाठवावीत. याशिवाय या विषयाला समर्पक कथा, कवितांचेही स्वागत केले जाईल.

         कोकणातील बोलीभाषांमधील साहित्याला साप्ताहिक कोकण मीडियामध्ये नेहमीच आवर्जून स्थान दिले जाते. दिवाळी अंकासाठीही कथा, कविता, स्फुट लेख, विनोदी लेखासारखे मालवणी, आगरी, संगमेश्वरी, बाणकोटी अशा कोकणातील विविध बोलीभाषांमधील साहित्य अवश्य पाठवावे.
          आपला मजकूर आणि छायाचित्रे kokanmedia1@gmail.com या ई-मेलवर किंवा कोकण मीडिया, कुसुमसुधा, ६९७, रामचंद्रनगर (श्रीनगर), खेडशी, रत्नागिरी-४१५६३९ या पत्त्यावर ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत पाठवावीत.


Sunday 6 August 2017

निराधारांना मदत करण्याची रत्नागिरीकरांना आज संधी

जीवन आनंद या सामाजिक संस्थेमार्फत पणदूर (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथे संविता आश्रम चालविला जातो. समाजातील असहाय, निराधार, मतिमंद अशा समाजाने नाकारलेल्या लोकांसाठी तो एक भक्कम आधार ठरला आहे. राजाश्रयाविना केवळ लोकाश्रयावर ही संस्था खऱ्या अर्थाने चालविली जाते. या संस्थेच्या मदतीसाठी रत्नागिरीतील माया फाउंडेशन या सामाजिक संस्थेने रविवार, ६ ऑगस्ट रोजी सांगीतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या निमित्ताने संस्थेला मदत करण्याची संधी रत्नागिरीवासीयांना मिळणार आहे.

संविता आश्रम स्थापन करणाऱ्या संदीप परब यांची आणि त्यांच्या अनोख्या कार्याची ओळख करून देणारा विशेष लेख वाचा 'बाइट्स ऑफ इंडिया'वर. त्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

.. http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4830959351638911950